Farmers Anudan List: नमस्कार शेतकरी बांधवांनो! तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी आलेली आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील आणि अलीकडील जून २०२५ मधील अतिवृष्टी, पूर आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं, त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
शेतकऱ्यांना जिल्हानिहाय ३६८ कोटींची मदत जाहीर
सरकारने बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून ₹३६८ कोटी, ८६ लाख, ८५ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर केलेली आहेत. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद येईल. चला, तुमच्या जिल्ह्यासाठी किती मदत मंजूर झाली आहेत, ते सविस्तर पाहूयात.
जून २०२५ मधील आपत्तीग्रस्त जिल्ह्यांसाठी मदत
जून २०२५ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले, त्यांना ही मदत मिळेल. सरकारने तातडीने पंचनामे करून निधी मंजूर केलेला आहे.
जिल्हा | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र (हे.) | मंजूर मदत (लाख रु.) |
---|---|---|---|
छ. संभाजीनगर | १७१ | ७२.३२ | १६.०१ |
हिंगोली | ३,२४७ | १,६११.३७ | ३६०.४५ |
नांदेड | ७,४९८ | ४,७९०.७८ | १,०७६.१९ |
बीड | १०३ | ११ | १.९९ |
अकोला | ६,१३६ | ३,७९०.३१ | ४०५.९० |
यवतमाळ | १८६ | १३०.५० | २५.४५ |
बुलढाणा | ९०,३८३ | ८७,३९०.०२ | ७,४४५.०३ |
वाशिम | ८,५२७ | ५,१६२.२८ | ४७१.२१ |
या मदतीमध्ये, अमरावती विभागासाठी एकूण ₹८६.२३ कोटी आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी ₹१४.५४ कोटी रुपयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मधील नुकसानीसाठी मदत
मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठीही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या कालावधीत सर्वाधिक नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्याला सर्वाधिक निधी मिळाला आहे.
जिल्हा | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र (हे.) | मंजूर मदत (लाख रु.) |
---|---|---|---|
धाराशिव | ३,२७,९३९ | १,८९,६१०.७० | २६,१४३.३८ |
छ. संभाजीनगर | ७,५४८ | ४,८९१.०५ | ६६५.४१ |
धुळे | १ | ०.३ | ०.०४ |
प्रशासनाची तातडीची कारवाई
या आपत्तीनंतर सरकारने त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. जिल्हा प्रशासनानेही तातडीने अहवाल सादर केल्यामुळे, ही मदत लवकर मंजूर झालेली आहे. मंत्री जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले आहेत की, राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास कटिबद्ध आहेत.