PM Vishvakarma Yojana Apply 2025: पारंपरिक व्यवसाय करून आपली उपजीविका चालवत असणार्या नागरिकांना केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणलेली आहे. ‘पीएम विश्वकर्मा योजना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेतून गवंडी, सुतार, टेलर, सोनार, लोहार अशा सुमारे 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसायिकांना प्रशिक्षण, अत्याधुनिक उपकरणे आणि आर्थिक मदत देण्यात येते आहे. आहे. या योजनेमुळे पारंपरिक कौशल्याला एक नवसंजीवनी मिळालेली आहे.
महिलांना बिनव्याजी कर्ज मिळत आहे; अर्ज करा
PM Vishvakarma Yojana Apply 2025
पीएम विश्वकर्मा योजना म्हणजे काय?
17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश पारंपरिक कौशल्ये असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन देऊन त्यांना आधुनिक युगासाठी सक्षम बनवणे हा आहेत. योजनेअंतर्गत कारागिरांना त्यांचे कौशल्य अधिक विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते, सोबतच त्यांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी आर्थिक मदतही मिळत आहे.
योजनेचे प्रमुख लाभ
या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात, जे खालील टेबलमध्ये दिलेले आहे:
लाभ | तपशील |
प्रशिक्षण | निवडलेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण दिले जात आहेत. या काळात दररोज ₹500 भत्ता मिळतोय. |
मोफत टूलकिट | प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, कारागिरांना ₹15,000 किमतीचे आधुनिक टूलकिट मोफत दिले जात आहे. |
आर्थिक मदत (कर्ज) | व्यवसाय वाढवण्यासाठी 5% कमी व्याजदराने कर्ज मिळतेय. पहिल्या टप्प्यात ₹1 लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ₹2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध आहेत. |
इतर फायदे | डिजिटल ओळखपत्र, प्रमाणपत्र तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ कशी मिळवे यासाठी मार्केटिंगचे मार्गदर्शन दिले जात आहेत. |
पात्रता आणि अर्ज प्रक्रिया कशी?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत:
- वय: अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावेत.
- अनुभव: अर्जदाराकडे त्याच्या पारंपरिक व्यवसायाचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक करण्यात आले आहेत.
- व्यवसाय: गवंडी, सुतार, टेलर, लोहार, कुंभार, सोनार, धोबी अशा 18 प्रकारच्या पारंपरिक व्यवसायांपैकी एका व्यवसायात कार्यरत असावेत.
अर्ज प्रक्रिया: या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया जिल्हा उद्योग केंद्रांमार्फत सुरू आहेत. आतापर्यंत सुमारे 25 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यांची छाननी सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, फोटो आणि मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे असणे आवश्यक आहेत.
पीएम विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कारागिरांना आत्मनिर्भर बनवण्याचे एक मोठे पाऊल आहेत. सरकारच्या या मदतीने ग्रामीण भागातील रोजगाराला देखील मोठी चालना मिळणार आहेत.